Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Saturday, September 22, 2018

Cityblog Feature: MPC News

Pune : डीजे-डॉल्बी नाही म्हणजे नाहीच ! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Pune: गणपती विसर्जनादिवशी शहरातील प्रमुख 17 रस्ते राहणार बंद

एमपीसी न्यूज- डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी व्यावसायिकांना दिलासा मिळालेला नाही. ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेता उच्च न्यायालयाने डीजे-डॉल्बीवरील बंदी काढता येणार नाही असे म्हटले आहे. याआधी ‘डीजे-डॉल्बी नाय म्हणजे नाय’, अशी ठाम भूमिका घेत राज्य सरकारने सणासुदीच्या काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या या वाद्यांवरील बंदीचे मुंबई उच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले.
डीजे- डॉल्बी आणि त्यासारखी इतर हाय डेसिबल ऑडीओ सिस्टीम ही कानठळय़ा बसविणारी अद्ययावत यंत्रणा आहे. डीजेचा स्वीच ऑन करताच त्याचा डेसिबल लेव्हल शंभरी पार करतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. ही बाब लक्षात घेऊनच सणासुदीच्या काळात या ऑडीओ सिस्टीमला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात ठणकावून सांगितले होते.
राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे डीजे-डॉल्बीच्या व्यवसायात असलेल्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नक्की काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. कालच पुण्यात 10 मंडळांविरोधात ध्वनी प्रदूषण केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता परवा होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळ काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे असणार आहे.
Pune : गणपती विसर्जनादिवशी शहरातील प्रमुख 17 रस्ते राहणार बंद

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात गणेश विसर्जनादिवशी मिरवणूक पाहायला येणा-या नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे. येत्या रविवारी (दि.23) शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यावर्षी देखील वर्तुळाकार मार्गाची आखणी करण्यात आली आहे.
शहरातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, गुरूनानक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, भांडारकर रोड, पुणे- सातारा रोड, सोलापूर रोड, प्रभातरोड हे प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत हे रस्ते बंद राहतील.
गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मंडईतील टिळक पुतळा येथून होणार आहे. पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका केवळ यांसारख्या वाहनांसाठी वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच सोमवारी दुपारनंतर शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात येतील.


Cityblog Feature: Fitness Tips by Fitcon


Cityblog Events Corner: Chattisgarh Handicraft and Textiles Expo


Chattisgarh Handicraft and Textiles Expo

Chhattisgarh handicraft and textiles expo going on at Tilak Smarak Mandir. Lovely collection of Kosa silk sarees, dhokra brass art and wrought iron sculptures. Do visit. The artisans need your support!! The expo is open till 27th September" Timings 11am to 9pm

Giridarshan Trek to Dhodap


Cityblog User: Ganesh festival economics

Cityblog User: The most beautiful Island

Friday, September 21, 2018

Cityblog Feature: MPC News

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यांची निविदा स्थायीकडे मंजुरीला 
एमपीसी न्यूज – वादग्रस्त निविदा प्रक्रियेमुळे गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या कात्रज – कोंढवा  रस्त्यांच्या कामाचा १४९ कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. मुदत वाढ देऊन देखील या कामासाठी केवळ एकच निविदा आली असून ती तब्बल २२ टक्के इतक्या कमी दराने आली आहे.
महापालिकेने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा खडी मशीन चौकापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या आणि ८४ मीटर रुंद रस्त्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासनाने २०११ मध्ये डिफर्ट पेमेंट पद्धतीने हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर हा निर्णय रद्द करून या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
त्या तब्बल ३६ टक्के जादा दराने आल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली. त्यात दोनवेळा मुदतवाढ देऊन केवळ एकच निविदा आली आहे. प्रशासनाने या कामासाठी १९२ कोटी ४२ लाखांचे अंदाजित खर्च धरून त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, ही निविदा २२.३० टक्के इतक्या कमी दराने आली आहे. त्यानुसार आता हे काम १४९ कोटी ५२ लाखांत होणार आहे. त्यामुळे पालिकेचे तब्बल ४२ कोटींची बचत होणार आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाबाबत महापालिकेने मागील दीड-दोन वर्षात कुठलीही हालचाल केली नाही.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर विविध स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यावर चौकशीची मागणी केली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपचे हडपसरचे आमदार योगेश टिळेकर या रस्त्त्याच्या कामासाठी आग्रही आहे. त्याचबरोबर  स्थायी समितीत भाजपचे बहुमत असल्याने या निविदा मंजूर होणार असल्याचे स्पष्ट आहे. मंगळवारी होणार्‍या समितीच्या बैठकित त्यावर निर्णय होणार आहे.

Cityblog Feature: Fitness tip from Fitcon


Cityblog Events Corner


Cityblog User: Motivational Video


Cityblog User: Old 1946 video(?) of Mumbai Girgaon Chowpaty on Ganesh Visarjan Day

Cityblog User: Harsha Bhogale presents for Cricket Fans

Thursday, September 20, 2018

Cityblog Feature: MPC News

Hinjawadi : दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एक गंभीर तर एक अत्यवस्थ


एमपीसी न्यूज – शेतमजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांनी बलात्कार केला. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी हिंजवडी जवळ घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. बलात्कार झालेल्या दोन मुलींपैकी एक गंभीर आहे तर एकीची प्रकृती अत्यवस्थ आहे.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी जवळ राहणाऱ्या शेतमजुरांच्या दोन मुली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने घराजवळील मंदिरासमोर खेळत होत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या साखर कारखान्यातील मजुराच्या दोन मुलांनी मिळून त्या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखविले आणि मंदिराच्या मागच्या बाजूला येण्यास सांगितले. चॉकलेट मिळणार म्हणून दोघीही मंदिराच्या मागे गेल्या. त्यावेळी आरोपींनी दोघींना मंदिराच्या मागे असलेल्या दाट झाडीमध्ये नेले. तिथे त्यांच्यावर बलात्कार केला. त्यातील एका मुलीवर दोघांनी मिळून बलात्कार केला. त्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला. दोघींनाही मानसिक आणि शारीरिक इजा झाली. दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एकीची प्रकृती अत्यंत नाजूक असून ती सध्या कोमामध्ये आहे. तर दुसऱ्या मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घडलेला प्रसंग घरच्यांना समजला तेंव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सुरुवातीला त्यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी त्यांना विश्वास दिला. त्यामुळे मुलीच्या आईने फिर्याद दिली. एक पीडित मुलगी बोलू शकत असल्याने तिच्या मदतीने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकजण सज्ञान आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog Special Punekar

Unique way to display phone no

Cityblog User: Angkor Vat

Cityblog User: Funny Jackie Chan Video


Cityblog User: For Roald Dahl Fans

Wednesday, September 19, 2018

Cityblog Feature MPC News

Hinjawadi : भूमकर चौकात अवजड वाहनांना प्रवेश बंद

एमपीसी न्यूज – भूमकर चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतुकीत बदल करत अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामध्ये सकाळी सात ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वगळण्यात आली आहेत. हा बदल आज (मंगळवार, दि. 18) पासून प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आला असून बुधवार (दि. 26) पर्यंत नागरिकांना सूचना आणि हरकती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सूचना आणि हरकती यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती बुधवार (दि. 26) पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे लेखी स्वरूपात पाठविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
असा असेल भूमकर चौकात अवजड वाहनांना प्रवेश बंद
# डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद
# मुंबई-बेंगलोर महामार्गावरून जिंजर हॉटेल येथून डावीकडे वळून भूमकर चौकाकडे जाणास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद
# मुंबई-बेंगलोर महामार्गावरून मायकार शोरूम येथून डावीकडे वळून भूमकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद
# वाकड ब्रिज येथून इंडियन ऑइल चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद

Cityblog Feature Insights by Aparna Ramesh (Expereinced Corporate Manager and Trainer)

Quick Fix to Negative Thoughts
We are all plagued by negative thoughts and we know they aren’t good for us. It affects our self confidence and spirals us down the rabbit hole. Typically when you try meditation, exercising or diverting your mind, it will help you ease the rush of negative thoughts albeit, temporarily. Which is why you need to do them every day. But how do you get rid of them permanently? You can when you create a mechanism which you can put into action whenever needed.Here’s are 4 quick steps that always worked for me


Recognise
. Very important step. You need to understand what is causing you this thought. Get into the root of it. Hear your thought & feel your emotions.

Look out for subtle cues or behaviors that indicate your thought process. Cues such as biting your nails or tapping an object or your feet restlessly and even procrastination.

Reset. Pause. Stop. Just like rebooting the computer. Except its not as easy. You probably can’t stop the thought but you can stop the behaviour that is causing out of that thought.

Cityblog User: Infosys Mangalore Campus


Cityblog User : Wagon R


Cityblog User: Malvani Chak De

Tuesday, September 18, 2018

Cityblog Feature MPC News

Pune : फक्त चारच तासात राँगसाईडने येणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल
एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियम मोडून राँग साईडने जाणाऱ्या वाहनचालाकांविरुद्ध दत्तवाडी पोलिसांनी राबवलेल्या अभियानात केवळ चार तासांमध्येच न्यायालयात चार्जशीट दाखल करून आरोपीना दंड देण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे अभियान सुरू केल्यानंतर या अभियानाअंतर्गत दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आज शाहू कॉलेज ते गजानन महाराज मंदिर चौक या रस्त्यावर लक्ष्मीनगर रहिवासी संघ सांस्कृतिक हॉल ते गजानन महाराज मंदिर चौक या नो एन्ट्रीच्या रस्त्यावर राँग साईडने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल करून आरोपीना दंड केला गेला.
शहरात वाढणाऱ्या वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असताना ते न पाळल्यास बऱ्याच वेळा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही कारवाई केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Cityblog Events Corner



Cityblog Appeal

Cityblog Appeals to all Citybloggers to send us photo of their Ganpati and Decorations

Pls mail us snaps on cityblogpuneonline@gmail.com

Cityblog Special: Sunder Pitchai Speech


Cityblog Special Google Records Earth Time Lapse

Cityblog User: Glass Art

Cityblog User: World Language video

Monday, September 17, 2018

Cityblog Tribute to HindKesari Ganpatrao Andalkar


Cityblog Appeal

Cityblog Appeals to all Citybloggers to send us photo of their Ganpati and Decorations

Pls mail us snaps on cityblogpuneonline@gmail.com

Cityblog Special ISRO Achievement


Cityblog Feature: MPC News

Hinjawadi : भूमकर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल

पुढील दहा दिवसात नागरिकांना सूचना व हरकती देण्याचे पोलिसांकडून आवाहन


एमपीसी न्यूज – भूमकर चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हिंजवडी वाहतूक विभागात वाहतूक कोंडीच्या बाबतीत हिंजवडी मधील शिवाजी चौकानंतर भूमकर चौकाचा नंबर लागतो. पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून हिंजवडीला वाहतूक कोंडीमधून मुक्त करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. शिवाजी चौकातील वाहतूक बदलानंतर पोलीस आयुक्तालयाकडून भूमकर चौकामधील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल देखील तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. येत्या दहा दिवसात नागरिकांना याबाबत सूचना आणि हरकती पोलीस आयुक्तालयाकडे जमा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सोमवार (दि. 17) ते बुधवार (दि. 26) दरम्यान हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काढले आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर येथे लेखी स्वरूपात पाठवाव्यात. नागरिकांच्या सूचना आणि हरकती लक्षात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.
भूमकर चौकातील वाहतुकीतील बदल –
# हिंजवडी गावातून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांनी सरळ जाऊन काळा खडक येथून यू-टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.
# डांगे चौकाकडून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांनी सरळ जाऊन मारुंजी वाय जंक्शन येथून यू-टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.
# शनी मंदिर येथून सर्व्हिस रोडने (सेवा रस्ता) भूमकर चौकात येणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
# सयाजी हॉटेल येथून सर्व्हिस रोडने (सेवा रस्ता) भूमकर चौकात येणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.


Cityblog User Live Macau Typhoon video


Cityblog User: Jump from Space by Austrian Astronaut


Giridarshan Video Tung Tikona Lohagad Visapur

Cityblog User: Why Guns and Roses stopped playing Rock

Sunday, September 16, 2018

Cityblog Feature: MPC News


Pune : पाच देशांच्या युद्ध सरावात चित्तथरारक प्रात्यक्षिके (व्हिडीओ)



एमपीसी न्यूज- परदेशातील सैन्यांसोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहावे तसेच उपनगरी भागातील दहशतवादाला आळा घालण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भारतीय लष्करातील सदर्न कमांड सोबत भारत, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका आणि म्यानमार या देशाच्या सैन्यदलांनी लष्करी सराव सुरु केला आहे. 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान पुण्याजवळील औंधमध्ये हा लष्करी चालू आहे.
बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅँण्ड इकॉनॉमिक को-आॅपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स 18 या पहिल्या लष्करी युध्द सराव घेण्यात येत आहे. या लष्करी सरावात भारत, भूतान, बांग्लादेश, म्यानमार आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकडयांचा सहभाग आहे. बिम्सटेकमधील देशांना दहशतवाद्यांशी लढण्याच्या एकमेकांच्या पद्धती, एकमेकांच्या लष्कराची कार्यपद्धती समजावी आणि त्यांच्यातील परस्पर सहकार्य वाढावे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे. निमशहरी भागातील दहशतवाद्यांचा बिमोड ही सरावाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
या युद्धसरावादरम्यान उद्या (दि.15) पाचही देशांच्या लष्कर प्रमुखांच्या एकत्रित परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत या युद्ध सरावाचा समारोप होणार आहे. सहभागी देशांचे प्रत्येकी पाच लष्करी अधिकारी आणि पंचवीस ज्युनिअर कमिशन अधिकारी या युद्ध सरावामध्ये सहभागी झाले आहेत. भारताचे माजी राजदूत जी. पार्थसारथी संयुक्त युद्ध सरावाचे निरीक्षक म्हणून काम करीत असून अशा पध्दतीचा लष्करी सराव बांग्लादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता.

Cityblog Feature: Nayakgiri

Cityblog Features: Ashish Joshi's Wildlife Photopgraphy

Few days ago wildlife enthusiasts from Pune witnessed a phenomenon like never before. Suddenly the news of a flock of Vernal hanging parrots feeding over "Bajra" fields near Pune went viral and all social media groups were flooded with photographs of the only parrot found in Indian subcontinent. 
Off course we were not an exception to witness this :-)

Vernal hanging parrot


Cityblog Special Engineer's Day



Mokshagundam Visvesvaraya, who was fondly called Sir MV, was literally the builder of India, the builder of dams and water systems, to be precise, which not only boosted irrigation facilities but also saved a large number of people from floods. He was an engineering pioneer of India whose genius reflected in harnessing of water resources and building and consolidation of dams across the country.

Every year India celebrates Engineer's Day on September 15, the birth anniversary of Visvesvaraya.

He went on to become India’s most prolific civil engineer, dam builder, economist and statesman. He was one of the most prominent builders of India in the 20th century.

When Visvesvaraya was the Diwan of Mysore from 1912 to 1918, he transformed the state into what was then known as a 'model state'. For his numerous industrial, economic and social projects, he was called "Father of Modern Mysore".
Visvesvaraya was also the chief engineer responsible for the construction of the Krishna Raja Sagara Dam in Mysore, the biggest in Asia at that time. In 1909, when the city of Hyderabad was in danger of getting flooded, Visvesvaraya was appointed as special consultant engineer to make the city flood-proof. His inventive engineering work saved the Visakhapatnam port from sea erosion.

Visvesvaraya is credited with inventing the block system, automated doors that close the water overflows. He designed and patented the floodgates which were first installed at the Khadakwasla reservoir in Pune in 1903.
Visvesvaraya established Government Engineering College in 1917 in Bengaluru which was later named University Visvesvaraya College of Engineering in his honour.

Due to his outstanding contribution to the building of India, the government conferred 'Bharat Ratna' on on him in 1955. He was also awarded the British knighthood by King George V, which put the honorific 'sir' before his name.

Cityblog User: Serena Controversy at US Open

Cityblog User: Beautiful Norway