Don't Miss this
पुणे सर्वोत्कृष्ट शहर जाणवतेय का – नागरिकांचा खुला संवाद
नुकतेच केंद्र सरकारने पुणे हे राहण्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून जाहीर केले आहे . संस्थात्मक ; सामाजिक ; आर्थिक व भौतिक सुविधा या चार प्रमुख निकषांवर आणि शैक्षणिक ; सांस्कृतिक ; आरोग्य ; सुरक्षितता ; रोजगारनिर्मिती ; वाहतूक ; गृहनिर्माण ; पाणीपुरवठा ; घनकचरा व्यवस्थापन ; प्रदूषण ; वीजपुरवठा ; सार्वजनिक मोकळ्या जागा या पूरक निकषांवर प्रमुख १११ शहरांची काटेकोर तपासणी करून आणि तेथील नागरिकांशी संवाद साधून हे मानांकन जाहीर केले असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या संदर्भात पुणेकर नागरिकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी रविवार दिनांक २ september रोजी सायंकाळी ५ वाजता सजग नागरिक मंचाने नागरिकांसाठी खुला संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . हा कार्यक्रम BMCC रस्त्यावरील IMDR सभागृहात होणार असून त्यात नागरिकांनी सहभागी होऊन वरील विषयावर आपली मते खुले पणाने मांडावीत असे आम्ही आवाहन करीत आहोत.
विवेक वेलणकर जुगल राठी
No comments:
Post a Comment